tag:blogger.com,1999:blog-19282892400892635032024-03-05T10:50:54.828-08:00Mahaamotivation महामोटीव्हेशनतुम्हाला मोटीव्हेट करणारे लेख आणि माहिती. मराठीत पहिल्यांदाच. लेखक मोटीव्हेटर महावीर सांगलीकर.
Motivational articles in Marathi by Motivator Mahaveer SanglikarMahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-37362370924487515852015-11-07T04:23:00.001-08:002015-11-07T04:41:13.750-08:00लक्ष्मी पूजन आणि धन-संपत्ती <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<div style="text-align: right;">
9145318228</div>
<br />
<br />
दिवाळी अमावास्येला भारतात आणि इतरही अनेक देशांमध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी पूजेबद्दल अनेकांनी लिहिले आहे, पण मी आज एका वेगळ्या मुद्द्यावर लिहित आहे.<br />
<br />
अनेकांचा असा प्रश्न असतो की बिल गेट्स लक्ष्मी पूजन करत नाही, तरीही तो अतिश्रीमंत आहे. तेंव्हा श्रीमंत होण्याचा आणि लक्ष्मी पूजनाचा काय संबंध? वरकरणी हा प्रश्न तर्कनिष्ठ वाटतो, पण प्रत्यक्षात तो अज्ञानातून येणारा प्रश्न आहे.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPlQH422gTM2DEUZWq9ylnywxDhGoL_kjoL-p0mdb2nHscJ3FMyqzv-B4HdwCwz8BVrXGO4P2kLZFLO9S77_brD8oCoy1A-KoxCssUJ0hoDPrcNiOtkUq9rL0fez_7rcXYMkOwCDmIz6At/s1600/Laksmi+Pooja.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="234" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPlQH422gTM2DEUZWq9ylnywxDhGoL_kjoL-p0mdb2nHscJ3FMyqzv-B4HdwCwz8BVrXGO4P2kLZFLO9S77_brD8oCoy1A-KoxCssUJ0hoDPrcNiOtkUq9rL0fez_7rcXYMkOwCDmIz6At/s320/Laksmi+Pooja.JPG" width="320" /></a></div>
हे मान्य आहे की केवळ लक्ष्मी पूजन करून धन-संपत्ती मिळत नसते, तर त्यासाठी तुम्ही पैसे मिळवण्याचे कांहीतरी उद्योग करावे लागतात. तुम्ही जर ते करत असाल आणि लक्ष्मी पूजनही करत असाल तर काय होते ते पहा. जेंव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करता तेंव्हा तुमच्या पुढे धन-संपत्तीची देवता लक्ष्मी असते, त्याच बरोबर प्रत्यक्ष धन (नोटा, नाणी, सोने, चांदी इत्यादी). पूजा करत असताना हे सगळे तुमच्या उघड मनात साठवले जाते आणि नंतर ते तुमच्या सुप्त मनात जाते. (आधुनिक भाषेत बोलायचे तर हे धन-संपत्तीचे व्हिज्युअलायझेशन असते. ही पूजा सहेतुक असते. म्हणजे या पूजेमागे धन-संपत्तीची देवता लक्ष्मी हिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि पुढेही धन-संपत्ती मिळत राहो असे दुहेरी हेतू असतात. <br />
<br />
या पूजेचा परिणाम म्हणजे पुढील काळातही तुमच्याकडे धन-संपत्ती आकर्षित होत रहाते, आणि तिचे प्रमाणही वाढत जाते.<br />
<br />
जगात वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या समाजांमध्ये वेग वेगळी व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स वापरली जातात. कोणी कोणते टेक्निक वापरावे हा ज्याचा-त्याचा किंवा जिचा तिचा प्रश्न आहे. बिल गेट्स लक्ष्मीपूजन करत नाही हा मुद्दा गैरलागू आहे. बिल गेट्स सारखे जिनिअस, हाय आय क्यू असणारे लोक व्हिज्युअलायझेशनसाठी आणखी वेगळे टेक्निक वापरत असतात. ते टेक्निक सगळ्यांनाच जमेल असे नाही. लक्ष्मी पूजन ही व्हिज्युअलायझेशनची सगळ्यात सोपी पद्धत आहे.<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<div>
<div>
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_25.html">सदिच्छा नाकारू नका</a></div>
<div>
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/12.html">यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 सोपे उपाय</a></div>
<div>
<a href="http://numerology-marathi.blogspot.in/2015/09/money-secrets-program.html">मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM</a></div>
<div>
<a href="http://numerology-marathi.blogspot.in/2015/07/blog-post.html">अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन</a></div>
</div>
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-56159220867118097632015-09-04T07:42:00.001-07:002015-09-04T07:42:10.233-07:00दुकानांची देवळे आणि ग्राहक देव <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />अनेक दुकानदार आपल्या दुकानांत देवादिकांचे, साधू-संतांचे फोटो लावतात. हे फोटो गिऱ्हाईकास सहज दिसतील अशा ठिकाणी लावलेले असतात. कांही दुकानदार तर रोज सकाळी आणि संध्याकाळी या फोटोंची पूजाअर्चा करतात. मी कांही असे दुकानदार बघितले आहेत की जे आपल्या दुकानातील सर्व नोकरांसह रोज संध्याकाळी अर्धाएक तास त्या फोटोंची साग्रसंगीत पूजा करतात.<br />
<br />ग्राहक हाच देव असे एकीकडे (नुसतेच) म्हणायचे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुकानात देवादिकांची पूजा करायची ही काय भानगड आहे?<br />
<br />तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात, एखाद्या कार्पोरेट ऑफीसमध्ये गेलात तर तुम्हाला हा प्रकार दिसणार नाही. ‘किरकोळ’ दुकानदारच असे प्रकार करत असल्याचे दिसते.<br />
<br />तुम्ही दुकानदार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत:<br />तुमच्या दुकानात येणारा पैसा हा ग्राहक आणत असतो. हा ग्राहक ना तुमचा देव पाठवतो, ना तुम्ही करत असलेली पूजा अर्चा. उलट तुमच्या दुकानात पूजा अर्चा चालू असेल तर येणारे गिऱ्हाईक पुढच्या दुकानात निघून जाते. <br />
<br />
तुमचे ग्राहक सर्वधर्मीय असतात. तुम्ही जेंव्हा तुमच्या दुकानात तुमच्या देवादिकांचे फोटो लावता, त्यावेळी त्याचा परिणाम तुमचे ग्राहक कमी होण्यात होतो.<br />
<br />तुम्ही देवभक्त असाल तर दुकानात तुम्ही तुमच्या ग्राहकालाच देव मानले पाहिजे. अनेक देवभक्त दुकानदार ग्राहकाशी उद्धट वागतात, त्याचा अपमान करतात. हे म्हणजे त्याने त्याच्या खऱ्या देवाचा अपमान करण्यासारखे आहे. दुकानात गिऱ्हाईक असताना त्याला ताटकळत ठेऊन पूजा करत बसने हा निव्वळ मूर्खपणा आहे.<br />
<br />व्यवसाय आणि देव, व्यवसाय आणि धर्म यांची गल्लत करता कामा नये. व्यवसायाच्या ठिकाणी केवळ व्यवसायच असायला पाहिजे.<br />
<br />तुम्हाला देवाची गरज असेलच तर त्याला तुम्ही तुमच्या घरात ठेवला पाहिजे. त्याच्या रहाण्यासाठी देवळेही आहेतच. पण तुम्ही दुकानात असताना तुमच्या मनात केवळ ग्राहक आणि तुमचा व्यवसाय याच गोष्टी पाहिजेत.<br />
<br />देवादिकांच्या पूजाअर्चेसाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा तेवढा पैसा आणि वेळ कस्टमर रिलेशन वाढवण्यासाठी केलात तर तुमच्या व्यवसायातले अनेक प्रश्न सुटतील. <br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_20.html">सोडा हा फुकटेपणा</a><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/07/blog-post.html">तुमचे प्रॉब्लेम्स सुटण्यासाठी…… </a></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-56905757927475883852015-07-19T02:39:00.002-07:002015-07-19T02:39:52.127-07:00लग्न होत नाही......? (मुलींसाठी)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<div style="text-align: right;">
8149703595 </div>
<br />अनेक तरुण-तरुणींचे लग्न वेळेवर होण्यात अनेक अडथळे येत असतात. चाळीशी ओलांडली तरी लग्न झालेले नाही अशा मुली समाजात मोठ्या संख्येने आहेत. असे होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असतात. त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे मुलींच्या आपल्या जोडीदाराविषयी अवास्तव अपेक्षा. भरीस भर म्हणून मुलीच्या पालकांच्यांही कांही वेगळ्या अवास्तव अपेक्षा असतात. (वास्तव अपेक्षा कशा असाव्यात या विषयावरील माझी शिवानीचं लग्न ही कथा वाचावी).<br />
<br />वेळेवर लग्न न होण्यामागे अवास्तव अपेक्षेबरोबरच दुसरे एक मानसिक कारणही आहे. ते म्हणजे अनेक मुलींच्या मनात ‘आपले लग्न होणारच नाही’ असा न्यूनगंड तयार झालेला असतो. त्यामुळे त्या उदास राहू लागतात. ‘आपले लग्न होणार नाही’ असे वाटत राहणे म्हणजे स्वत:च स्वत:ला तशी सूचना देत रहाणे (सेल्फ सजेशन) होय. हा स्वसंमोहनाचा (Self Hypnosis) प्रकार आहे. यामुळे अशा मुली आपल्या लग्नाची आशा पूर्णपणे सोडून देतात, आपल्या लग्नाचे स्वप्न बघत नाहीत. याचा होणारा परिणाम म्हणजे खरेच अशा मुलींचे लग्न होत नाही.<br />
<br />ज्या मुलींच्या मनात असा न्यूनगंड तयार झालेला असतो त्यांनी त्यातून लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे. ‘माझे लग्न होणारच’, ‘मला पाहिजे तसा मुलगा लवकरच माझ्या आयुष्यात येणार आहे’ असाच विचार या मुलींनी केला पाहिजे, तशी स्वप्ने बघायला पाहिजेत आणि आपल्याला आवडेल मुलाशी अवास्तव अपेक्षा न बाळगता लग्न करायची तयारी ठेवली पाहिजे. आपल्या लग्नाविषयी पॉझिटीव्ह राहिले पाहिजे. असे केल्यास या मुलींची लग्ने लवकर होण्यास मदत होईल.<br /><br />हेही वाचा:<br /><a href="http://mahaakatha.blogspot.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82%20%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8:%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%201">शिवानीचं लग्न: भाग 1 </a><br />
<a href="http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post_5.html">गौरीचं लग्न</a><br />
</div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-43208088955954591662015-07-15T01:49:00.000-07:002015-07-15T01:49:32.168-07:00मुलींचा ड्रेस कोड आणि पुरुषांची मानसिकता <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br />मुलींच्या बाबतीत साडी हा ड्रेस आता कालबाह्य झालेला आहे. बहुतेक मुली, मग त्या उत्तरेतील असो वा दक्षिणेतील, आता पंजाबी ड्रेस वापरतात. कित्येक मुली तर या ड्रेस बरोबर बुरखाही वापरतात. खरे म्हणजे हा इस्लामिक ड्रेस कोड आहे पण पुरुषांना, अगदी सनातनी, हिंदुत्ववादी पुरुषांना देखील तो अजिबात खटकत नाही. याउलट एखाद्या मुलीने जीन्सची प्यांट आणि टी शर्ट किंवा शर्ट असा ड्रेस वापरला तर ते मात्र अनेक पुरुषांना खटकते. असे का?<br />
<br />खरे म्हणजे मुलींनी प्यांट-शर्ट वापरण्यात चुकीचे कांहीच नाही. या ड्रेसमध्ये त्यांचे बहुतांश अंग झाकले गेलेले असते. हा ड्रेस आणि साडी-ब्लाऊज यांच्यात तुलना करून बघा. तरीही या ड्रेसला पुरुषांचा विरोध असण्याचे कारण हे सरळ सरळ पुरुषी सत्तेवर झालेले झालेले स्त्रियांचे आक्रमण आहे. हा ड्रेस पुरुषांचा असूनही स्त्रिया तो घालतात म्हणजे काय? पुरुषांच्या इगोला त्यामुळे मोठा धक्का पोहोचतो. या विरोधामागे संस्कृतिरक्षण वगैरे जी कारणे दिली जातात ती तकलादू आहेत. खरे दुखणे पुरुषांचा इगो दुखावला जाणे हेच आहे. <br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-82445642626124318862015-07-13T07:25:00.001-07:002015-07-13T07:25:07.808-07:00तुमचे प्रॉब्लेम्स सुटण्यासाठी…… <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर <br />मोबाईल फोन: 8149703595</div>
<br /><br />मला अनेकदा अनुभव येतो की बहुतेक लोकांना त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यात, दिलेले सल्ले पाळण्यात रस नसतो. एखाद्या विश्वासू व्यक्तिने आपल्या व्यथा ऐकून घ्याव्यात एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. आपले मन कुणापुढे तरी मोकळे केले की त्यांना बरे वाटते. <br />
<br />पण नुसते मन मोकळे झाले म्हणून मूळ प्रश्न कसा काय सुटेल? ज्या व्यक्तिपुढे तुम्ही मन मोकळे करता, ती व्यक्ति जर समुपदेशक असेल, अनुभवी असेल तर तिने दिलेले सल्ले तुम्ही अमलात आणले तरच तुमचे प्रश्न सुटू शकतात. पण वर लिहिल्या प्रमाणे जर अनेक लोकांना आपले प्रश्न सुटावेत असे वाटतच नाही, निदान त्यांच्या सुप्त मनात तरी, तर ते लोक सल्ले कशाला पाळतील? अनेकांच्या बाबतीत तर असे वाटते की ते आपले प्रॉब्लेम्स एन्जॉय करत असावेत. दु:ख, व्यथा, चिंता यातच आनंद मिळत असेल तर प्रश्न सोडवून घेण्याची गरजच काय?<br />
<br />पण ज्यांना खरोखरच आपले प्रॉब्लेम्स सुटावेत असे वाटते, त्यांनी पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे: <br />तुम्हाला जे कांही प्रॉब्लेम्स असतील, ते लवकरात लवकर सुटावेत यासाठी तुम्ही लगेच प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही स्वत: चिंतन, विचार करून पुढे काय करायचे ते ठरवू शकता. तसेच गरज असेल तर तुम्ही अनुभवी व्यक्ति, समुपदेशक यांचा सल्ला घेऊ शकता. त्यांनी दिलेले सल्ले शास्त्रीय, मनोवैज्ञानिक असतील तर ते तुम्ही लगेच अमलात आणले पाहिजेत. सल्ला देणारी व्यक्ति तुम्हाला अंधश्रद्धा वाढवणारे सल्ले देत असेल (खडे, अंगठ्या, ताईत, गंडे दोरे, पूजा अर्चा, कर्मकांड वगैरे) तर अशा सल्ल्यांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. अशा सल्ल्यांमुळे तुम्हाला तात्पुरते समाधान मिळते. त्याचा कायम स्वरूपी उपयोग होत नाही. तुमच्या प्रॉब्लेम्सचे मूळ आणि मुख्य कारण तुमचा उपजत स्वभावदोष आणि त्यामुळे तुमच्या हातून होत असणाऱ्या चुका हेच असते, ही गोष्ट तुम्ही नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. <br /><br />
प्रॉब्लेम सोडवण्यात चालढकल केल्याने तुमचे प्रॉब्लेम्स आणखीनच वाढत जातात ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.<br /><br />
हेही वाचा: <br /><a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_20.html">सोडा हा फुकटेपणा</a><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/12.html">यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 स...</a><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_7.html">उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी</a> </div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-44128089940879375742015-03-26T11:17:00.001-07:002015-04-12T03:53:57.529-07:00कम्युनिकेशन स्कील: छोट्या शब्दांची मोठी जादू <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर<br />
9145318228 Talks<br />
8149703595 Whats App </div>
<br />
<br />
कोणत्याही मंत्रांपेक्षा Thank You, Sorry, Congrats, Good Morning, welcome, Well done, bye हे शब्द जास्त शक्तिशाली आहेत. हे शब्द तुम्हाला पॉझिटिव्ह बनवतात. तुम्हाला मानसिक शांती देतात. शिवाय हे शब्द उच्चारण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागत नाही. एखादा मंत्र म्हणण्यात तुमची कित्येक मिनिटे जातात, पण मी वर सांगितलेला एखादा शब्द म्हणायला फार तर दोन सेकंद लागतात.<br />
<br />
बहुतेक मंत्र हे तुम्हाला न कळणा-या भाषेत असतात. तुम्हाला त्यांचा अर्थ माहीत नसतो. याउलट वरील शब्द हे तुमच्या ओळखीचे असतात आणि तुम्हाला त्यांचा अर्थ चांगलाच माहीत असतो. त्यामुळे ते शब्द तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरल्याने तुम्हाला त्यांचा चांगलाच उपयोग होतो. <br />
<br />
तुमच्या मंत्रोच्चाराने तुमचे लोकांशी असणारे संबंध सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. मंत्रोच्चाराने तुम्हाला एखादे वेळेस मानसिक शांति मिळेल पण त्यापलिकडे तुमचा कांही फायदा होणार नाही. मत्रोच्चाराने तुमची अडलेली कामे होण्याचा प्रश्नच येत नाही. पण मी वर सांगितलेले शब्द उच्चारायची सवय तुम्हाला लागल्यास लोक तुमच्याशी आपुलकीने वागायला लागतील. वेळप्रसंगी तुमच्या मदतीला येतील. तुमचा लोकसंग्रह वाढत जाईल. <br />
<br />
इथे तुम्ही हेही लक्षात घ्यायला पाहिजे की बहुतांश मंत्र हे देवाला खुश करण्यासाठी असतात. देव असलाच तर तो कांही खूष व्हायला किंवा रागवायला माणूस नाही. त्यामुळे तुम्ही स्वत:ला आणि इतरांना आपल्या बोलण्यातून, छोट्या छोट्या गोष्टीतून खूष केल्यास तुमचा जास्त फायदा होईल. <br />
<br />
कांही देवभक्तांचा असा समज असतो की आपल्याला मदत करणारा माणूस देवाने आपल्याकडे पाठवला आहे. ठीक आहे, ज्याची त्याची श्रद्धा. पण मग त्या देवाने पाठवलेल्या माणसाशी व्यवस्थित, गोड बोलायला नको का? <br />
<br />
तुम्हाला ज्या अडचणी येतात, अडथळे येतात त्याचे मुख्य कारण तुम्ही लोकांशी नीट बोलत नाही किंवा फारसे बोलत नाही हे असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे कम्युनिकेशन स्कील वाढवल्यास तुमचे सगळे अडथळे दूर होतील. <br />
<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/12.html">यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 स...</a><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_20.html">सोडा हा फुकटेपणा</a><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_25.html">सदिच्छा नाकारू नका</a></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-6471412315773371902015-02-25T06:48:00.000-08:002015-02-25T06:48:15.703-08:00 विद्रोह घाला चुलीत.....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<br />कांही लोकांना सिस्टीमचा भयंकर राग येतो. ते सिस्टीमच्या विरोधात सतत बोलत असतात. सिस्टीम बदलायला पाहिजे असे म्हणतात त्यांचे हे बोलणे बेसलेस तर असतेच, पण त्यांच्या बोलण्यात एक विखार असतो. सिस्टीम, ती चालवणारे लोक यांच्या विरोधात हे लोक असभ्य भाषेत टीका करत असतात. त्यातील अनेकांना वाटते की सिस्टीम चालवणारे सध्याचे लोक बदलून तेथे दुस-या लोकांना बसवले की सिस्टीम नीट चालेल. त्यांचे हे विचार म्हणजे बालीशपणा आणि भोळेपणा यांचे अजब मिश्रण आहे.<br /><br />सिस्टीमवर राग काढणा-यांचा खर प्रॉब्लेम वेगळाच असतो. एकतर हे लोक जीवनात अपयशी असतात, किंवा समाधानी नसतात. त्यातील अनेकांच्या घरी कलह असतो. हे लोक कोणतेही विधायक काम करत नसतात. आपल्या अपयशाचा राग सिस्टीमवर, ती चालवणा-यांच्या वर काढणे हे त्यांना सोयीस्कर असते. कारण सिस्टीम किंवा ती चालवणारे लोक यांना देण्यात येणा-या शिव्या तिथेपर्यंत पोहोचतच नसतात. त्यामुळे तिकडून कांही धोका नसतो. जिथे धोका आहे तिथे हे लोक चूप बसतात. म्हणजे बघा, आपला बाप रोज दारू पिवून घरात धिंगाणा घालतो, आईला मारहाण करतो त्यावेळी हे लोक बघत बसलेले असतात. आपल्या हौसिंग सोसायटीच्या प्रश्नांबद्दल सोसायटीच्या अध्यक्षाला बोलण्याची यांची हिम्मत नसते, आणि आपल्या गल्लीत तुंबलेल्या गटाराबद्दल नगरसेवकाला जाब विचारण्याचीही त्यांची हिम्मत नसते. त्यापेक्षा दिल्लीतल्या नेत्यांना शिव्या देणे किती सोपे असते...<br /><br />अशा लोकांनी आधी स्वत:चे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातील राग इतरांच्यावर काढण्यापेक्षा त्याचे रुपांतर सकारात्मक कामात केले पाहिजे. तुम्ही सिस्टीम बदलू शकत नाही. ते तुमचे कामही नाही. जी कामे तुमचे स्वत:ची आहेत, कुटुंबाची आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर तुमची स्वत:ची सिस्टीम नीट चालू लागेल.<br /><br />जेंव्हा तुम्ही सतत विद्रोही बोलता, विद्रोही लिहिता तेंव्हा खुशाल समजा की तुमचे जीवन चुकीच्या दिशेने चालेले आहे. तुमच्या या विद्रोहाची मुळे तुमच्या घरातच आहेत. तेथे तुम्ही संवाद करण्यात कमी पडता म्हणून तुम्ही सामाजिक विद्रोह करणा-या संघटनांमध्ये सामील होता. घरातील लोकांच्यावरील राग व्यवस्थेवर, एखाद्या समाजावर काढत बसता. एकदा का तुम्ही यात अडकला की तुमच्या आयुष्यातील बराच काळ वाया जाणार हे नक्की.<br /><br />विद्रोह म्हणजे दुसरे तिसरे कांही नसून तुमच्या हार्मोन्समुळे झालेला केमिकल लोच्या आहे.<br /><br />विद्रोही संघटनांपासून दूर राहायचे असेल तर आधी विद्रोही विचारांपासून दूर रहायला शिका. विद्रोही विचार पसरवणा-या साहित्यापासून दूर रहा. वाचायची आवडच असेल तर सकारात्मक, उपयोगी साहित्य वाचा. ललित साहित्य वाचा. जगातील उत्तम उत्तम लेखकांचे साहित्य वाचा. विद्रोही पुस्तकांना हातही लावू नका. तुमच्या घरात जर विद्रोही पुस्तके असतील तर त्यांची रद्दी घाला. घरात कचरा ठेवायचा नसतो, तसेच विद्रोही साहित्यही ठेवायचे नसते.<br /><br />तुमच्यामुळे समाज परिवर्तन होईल असे वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. परिवर्तन हे परिस्थितीमुळे आपोआप होत असते. त्यासाठी विद्रोह, चळवळी असे वेगळे कांही करायची गरज नसते. भारतातली, जगातली सामाजिक क्रांती, शैक्षणिक क्रांती ही औद्योगिक क्रांतीमुळे झाली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर ते प्रचंड रोजगार निर्मिती करणा-या भांडवलदारांना द्यावे लागेल.<br /><br />तुमचे जीवन तुमच्यासाठी आहे. तुमच्या कुटुंबासाठी आहे. विद्रोह करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्या ऐवजी गरजू लोकांना योग्य कारणासाठी वेळप्रसंगी मदत करा. समाज सेवेची फारच हौस असेल तर एखादा उद्योग सुरू करा, आणि लोकांना रोजगार द्या. रोजगार निर्मितीएवढी मोठी समाजसेवा दुसरी असू शकत नाही.<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-66576622340087272792015-02-25T06:13:00.001-08:002015-02-25T06:13:09.074-08:00सदिच्छा नाकारू नका <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
महावीर सांगलीकर <br />8149703595, 9623725249</div>
<br /><br />ही 25 डिसेंबरची घटना आहे. मी व्हाट्स अॅपवरनं माझ्या सगळ्या मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला. बहुतेकांनी मला त्याचा प्रकारचा मेसेज, ग्रीटिंग इमेज उत्तर म्हणून पाठवले. पण एका मित्राने मला पुढील मेसेज पाठवला:<br /><br />‘हा सण आपला आहे का? आपण का मेरी ख्रिसमस म्हणायचे? आजच्या दिवशी जगात अब्जावधी अंडी फोडली जातात, तुम्ही मेरी ख्रिसमस असा मेसेज पाठवून या पापात सहभागी होत आहात’<br /><br />मला त्या मित्राची कीव करावीशी वाटली. मी त्याला मेसेज पाठवला, ‘अरे बाबा, हाच नियम तू दिवाळी या सणाला लावणार का? दिवाळीत पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, वयस्क लोक, रोगी, गरोदर महिला यांना भयंकर त्रास होतो, पक्षी, प्राणी यांनाही त्रास होतो, कित्येक ठिकाणी आगी लागून माणसं मरतात. तू मला दिवाळीत मला शुभ दीपावली असा मेसेज पाठवला होतास. त्याचा अर्थ वरच्या सगळ्या पापात तू सहभागी झालास अस घ्यायचा का?’<br /><br />पण त्याच्या नंतरही तो माझ्याशी वाद घालत बसला.<br /><br />खरं म्हणजे कोणत्याही धर्माचा सण, उत्सव असतो त्या दिवशी सगळीकडे एक पॉझीटीव्ह वातावरण असते. त्या वातावरणाचा तुम्ही स्वत:साठी फायदा करून घ्यायला पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला कोणी शुभेच्छा दिल्या तर त्या तुम्ही नाकारल्या नाही पाहिजेत. त्या शुभेच्छा दुस-या धर्माशी संबधीत असल्या तरी तुम्ही त्या स्वीकारायला पाहिजेत. तुम्हाला कोणी ईदच्या दिवशी ईद मुबारक म्हटलं, ख्रिसमसला मेरी ख्रिसमस म्हटलं, दिवाळीला हॅप्पी दिवाळी म्हटलं तर तुम्ही या शुभेच्छा मनापासून स्वीकारल्या पाहिजेत आणि तुम्हीही तशाच प्रकारच्या शुभेच्छा द्यायला पाहिजेत. <br /><br />कांही लोक प्रत्येक बाबतीत ‘आपले आणि त्यांचे’ या भेदभावाला बळी पडलेले असतात. कांही लोक विशिष्ट विचारसरणीला बळी पडलेले असतात, त्यामुळे दुस-या समाजाला आपलं शत्रू मानत असतात. कांही लोक तर इतके कर्मदरिद्री असतात की त्यांना कुणी ह्याप्पी दिवाली म्हटलं तर ते उलट शुभेच्छा देण्याऐवजी ‘इंग्रजीत शुभेच्छा का दिल्या?’ म्हणून वाद घालत बसतात... त्यांना 1 जानेवारीला हॅप्पी न्यू यिअर म्हटलं तर ‘ते आपले नववर्ष आहे का? आपण गुढी पाडव्याला ते साजरे करायला पाहिजे’ असा उपदेश करतात. या लोकांना ‘सलाम आलेकूम’ असे कुणी म्हणाले तर चालत नाही आणि कांही महाभागांना Good Morning हे शब्द सुद्धा चालत नाहीत. (सलाम आलेकूम या शब्दाचा धर्माशी कांही संबंध नाही, हे शब्द म्हणजे अरबी भाषेतली शुभेच्छा आहे. तिचा अर्थ ‘तुम्हाला शांती लाभो असा आहे). <br /><br />हे सगळे सदिच्छा, शुभेच्छा नाकारणारे निगेटिव्ह लोक आहेत. अशा लोकांच्या पासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आणि बिनदिक्कत तुमच्यापासून दूर केले पाहिजे. त्यांना सुधरवण्याच्या फंदात पडायला नाही पाहिजे, कारण हे लोक सुधारण्याच्या पलीकडचे असतात. उलट त्यांच्या सहवासात राहून तुम्हीच देखील निगेटिव्ह होण्याची शक्यता असते, निदान तुम्हाला डोकेदुखी होते आणि तुमचा वेळही वाया जातो. <br /><br />शहाण्यांना उपदेशाची गरज नसते आणि मूर्खांना उपदेश करून त्याचा कांही उपयोग होत नसतो.<br /><br />सुरवातीला सांगितलेला माझा मित्र सुधारण्याच्या पलीकडला हे लक्षात येताच मी त्याला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधनं आणि मनातनं त्याचवेळी काढून टाकलं. <br /><br />
हेही वाचा:<br />
<span class="item-title"><a href="http://mahaa-motivation.blogspot.com/2015/02/blog-post_6.html" target="_self">मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?</a></span><br />
<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-90836526891973129272015-02-24T20:07:00.000-08:002015-02-24T20:11:33.732-08:00ज्ञान कुणाकडून आणि कसे मिळवावे?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<div style="text-align: right;">
9623725249 </div>
<br />
ज्ञान मिळवण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यातला श्रेष्ठ प्रकार म्हणजे दुस-या कुणाच्या मदतीशिवाय स्वत:च मिळवलेले ज्ञान. हे स्वत: चिंतन करून, अभ्यास करून मिळवता येते. Self Study is Supreme Study. पण अशा प्रकारे ज्ञान मिळवणे फारच थोड्या लोकांना शक्य असते, कारण त्यासाठी लागणारी पात्रता, बुद्धिमत्ता सगळ्यांच्यात नसते. या प्रकारे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला सामान्य माणसांसारखे वागून चालत नाही. तुम्ही सामान्य माणसांपेक्षा वेगळे व्हावे लागते. तुम्ही जर असामान्य असाल तर मग तुम्हाला या प्रकारे ज्ञान मिळवणे सहज शक्य असते. <br />
<br />
तुम्ही जर असामान्य असाल तर तुम्हाला मी किंवा आणखी कुणी ज्ञान कसे मिळवावे हे सांगायची कांहीच गरज नाही.<br />
<br />
ज्ञान मिळवण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ज्ञानी लोकांच्याकडून ते मिळवणे. तुम्हाला या प्रकारे ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही खालील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.<br />
<br />
1. तुम्हाला ज्या व्यक्तीकडून ज्ञान मिळवायचे आहे, ती व्यक्ति खरेच ज्ञानी आहे याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या ज्ञानी व्यक्तीबाबत चार जाणकार लोकांकडून माहिती करून घ्यावी लागेल, तसेच प्रत्यक्ष ज्ञान मिळवताना तुम्हाला तुमची प्रज्ञा वापरून ती व्यक्ति खरेच ज्ञानी आहे की नाही हे ठरवावे लागेल. <br />
<br />
2. ती व्यक्ति धर्म, पंथ, देश, प्रदेश, भाषा वगैरे कोणत्याही बाबतीत पक्षपाती नसली पाहिजे. ती व्यक्ति ज्ञानाच्या बाबतीत विशिष्ठ परंपरेची आग्रही नसायला पाहिजे, आणि त्या व्यक्तिचे ज्ञान तौलनिक (Comparative) असायला पाहिजे. <br />
<br />
वरील गोष्टींची खात्री पटली की तुम्ही त्या व्यक्तीकडून ज्ञान मिळवायला हरकत नाही. ते मिळवताना तुम्ही खालील पथ्ये पाळली पाहिजेत.<br />
<br />
1. जिच्याकडून ज्ञान मिळवायचे त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात आदरभाव पाहिजे.<br />
<br />
2. ती व्यक्ति तुम्हाला ज्ञान देत असताना तुम्ही ते पूर्ण लक्ष देऊन घेतले पाहिजे. त्यावेळी तुमच्या मनात इतर कसलेही विचार नाही पाहिजेत. तुम्ही मौन राहून ऐकले पाहिजे, आणि आपण ऐकत आहोत हे सांगणा-याच्या लक्षात येईल असे दिसले पाहिजे.<br />
<br />
3. ज्ञान मिळवताना तुम्ही प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असायला पाहिजे.<br />
<br />
4. ती व्यक्ति ज्ञान देत असताना तुम्ही मध्येच प्रश्न, शंका विचारता कामा नये. हे काम तुम्ही सर्व कांही ऐकून झाल्यावर केले पाहिजे. प्रश्न, शंका विचारताना तुम्ही ते नेमक्या शब्दात, थोडक्यात आणि नम्रपणे विचारले पाहिजेत.<br />
<br />
5. प्रश्न, शंका विचारण्याचा तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे, ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल आणि शंकांचे निरसन होईल.<br />
<br />
6. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की ज्ञान देणारी व्यक्ति तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि तुम्ही दुय्यम आहात.<br />
<br />
7. जर तुमच्या लक्षात आले की ज्ञान देणारी व्यक्ति प्रत्यक्षात ज्ञानी नाही आणि ती चुकीचे सांगत असते, तर तुम्ही अशा व्यक्तीकडून ज्ञान घेणे बंद केले पाहिजे.<br />
<br />
8. फुकट मिळालेले ज्ञान हे निरुपयोगी असते. त्यामुळे तुम्हाला ज्या व्यक्तिने ज्ञान दिले, तिला तिचा योग्य मोबदला दिला पाहिजे. हा मोबदला पैशाच्याच रुपात असला पाहिजे असे नाही, तर तुम्ही तो इतर प्रकारेही देऊ शकता. जर ज्ञान देणारा तुम्हाला मोफत ज्ञान देत असेल, तरीदेखील तुम्ही त्याचा मोबदला दिला पाहिजे. ज्ञान देणा-याने मोबदला घ्यायचे नाकारले तर तुम्ही तो मोबदला गरजूंना मदत म्हणून दिला पाहिजे, विशेषत: शैक्षणिक कामासाठी, गरजू विद्यार्थ्यांना वगैरे.<br />
<br />
9. ज्ञान देणारी व्यक्ति वयाने तुमच्यापेक्षा लहान असली तरी वरील पथ्ये तुम्ही पाळली पाहिजेत.<br />
<br />
तुम्हाला पुस्तके वाचूनही ज्ञान मिळवता येते. पण त्यासाठी काय वाचावे आणि काय वाचू नये याचे मूलभूत ज्ञान तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही चुकीची पुस्तके वाचली तर तुम्हाला चुकीचेच ज्ञान मिळेल. <br />
<br />
हेही वाचा:<br />
<a href="http://mahaakatha.blogspot.in/2014/06/blog-post_19.html">वाचक </a><br />
<a href="http://mahaa-motivation.blogspot.in/2015/02/blog-post_6.html">मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी?</a></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-64781874075158558192015-02-20T00:44:00.000-08:002015-02-20T00:44:41.303-08:00सोडा हा फुकटेपणा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर <br />
9623725249</div>
<br />
<br />
हा लेख लिहायचे कारण म्हणजे बरेच लोक माझ्याकडून फुकट सल्ल्याची अपेक्षा धरतात. पण तुम्हाला मिळणारा फुकट सल्ला निरुपयोगी असतो हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. कोणताही सल्ला तुम्ही जेंव्हा विकत घेता तेंव्हाच त्याचा तुम्हाला उपयोग होत असतो.<br />
<br />
कांही लोकांना भरपूर पैसे मिळत रहातात. त्यांच्याकडे पैशांचा सतत ओघ चालू असतो. तर दुसरीकडे अनेकांना नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या दोन्ही परिस्थितिमागे अनेक कारणे आहेत. त्यातील एका कारणाची माहिती मी येथे देत आहे.<br />
<br />
तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह अडवणारे एक मोठे कारण म्हणजे फुकटेपणा हा असतो. तुम्ही जर तुम्हाला एखादी वस्तू, सेवा, मार्गदर्शन, माहिती वगैरे फुकट मिळावी अशी इच्छा बाळगत असाल, तसे प्रयत्न करत असाल, तर तुमची ही प्रवृत्ती निश्चितच तुमच्याकडे येणा-या पैशांच्या प्रवाहाला अडवून धरते. <br />
<br />
हे असे का घडते? त्याचे उत्तर सोपे आहे. जेंव्हा तुम्ही फुकटे बनता, तुम्हाला फुकटेपणाची सवय लागते, तेंव्हा विकत घेण्याची आणि विकत घेण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्याची तुमची प्रवृत्ती आपोआपच कमी होते किंवा mमरून जाते. फुकट जर मिळत असेल तर विकत कशाला घ्या? आणि फुकट जर मिळत असेल तर जास्त पैसे कशाला मिळवा? अशी घातक प्रवृत्ती तुमच्यात तयार होते. <br />
<br />
फुकट मिळाल्याने आपले पैसे वाचतात असे तुम्हाला वाटू शकते, पण प्रत्यक्षात तुमचे पैसे वाचतच नसतात. फुकटेपणाने बचत करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करत असता. याउलट तुम्ही जेंव्हा विकत घेत असता, तेंव्हा त्यासाठी लागणारे पैसे तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत असता. विकत घेतल्यामुळे तुमचा खर्च वाढतो, आणि खर्च वाढला की तुमचे उत्पन्नही वाढते. फुकटेपणा, कंजूषपणा तुम्हाला आळशी बनवतो, याउलट जर तुम्ही सढळ हाताने खर्च करत असाल तर आळस तुम्हाला शिवतही नाही. तुमचा लोकसंग्रहही वाढतो. <br />
<br />
तुम्ही जर फुकटे असाल तर मित्र मंडळीत, नातेवाईकांच्यात, समाजात तुमची प्रतिमा कशी बनत असेल याचाही तुम्ही विचार करायला पाहीजे. याउलट तुम्ही जेंव्हा सढळ हाताने खर्च करणारे असता, तेंव्हा तुमची एक चांगली प्रतिमा तयार होत असते. याचाही तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढवण्यास मदत होत असते.<br />
<br />
हे जसे व्यक्तीला लागू होते तसे समाजालाही लागू होते. कांही समाजांना सरकारी नोकरीत आरक्षण आहे, अनेक क्षेत्रात सोयी सवलती आहेत, याउलट कांही समाजांना या गोष्टी मिळत नाहीत. ज्यांना सोयी-सवलती नाहीत, आरक्षण नाही ते समाज स्वत:च्या बळावर सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेले दिसतात, तर ज्यांना या गोष्टी मिळतात ते समाज मागेच राहिलेले दिसतात. <br />
<br />
पैशाकडे पैसा येतो, तसेच पैसे खर्च करणा-याकडेही पैसा येत असतो. अनेकांना ही गोष्ट विचित्र वाटेल, पटणारही नाही, पण तुम्ही ही गोष्ट स्वत: अजमावून बघू शकता. तुम्ही जर कंजूष असाल, फुकटे असाल तर पैसे खर्च करायला शिका, तुम्ही दुस-याकडून घ्याल त्याचा योग्य मोबदला देत चला, मग पहा काय घडते ते. या बाबतीत तुम्हाला कांही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.<br />
<br />
<br />
<b>हेही वाचा:</b><br />
<span class="item-title"><a href="http://mahaa-motivation.blogspot.com/2015/02/blog-post_7.html" target="_self">उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी</a></span><br />
<span class="item-title"> </span> </div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-12555285280079346812015-02-06T09:41:00.001-08:002015-02-06T09:41:23.522-08:00उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर </div>
<br /><br />’साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या विचारापासून तरुण-तरुणींनी दूर राहिले पाहिजे. तुमची विचारसरणी तर उच्च असायलाच पाहिजे, पण तुमचे राहणीमान देखील उच्चच असायला पाहिजे. तुम्ही उच्च दर्जाच्या कॉलेजमध्ये शिकायला पाहिजे, रस्त्यावरचा चहा पिण्याऐवजी, तेथे नाश्ता करण्याऐवजी चांगल्या हॉटेलमध्ये चहा-नाश्ता घ्यायला पाहिजे, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे. तुम्ही इलाईट क्लासमधले मित्र मिळवायला पाहिजेत आणि तुमचा बॉय फ्रेंड/गर्लफ्रेंड देखील इलाईट क्लासमधलाच पाहिजे. हे करण्यासाठी तुमचा जन्म इलाईट क्लासमधल्या घरातच झाला असला पाहिजे असे नाही. तुम्ही गरीब घरात जन्माला आला असला तरी वरील गोष्टी करू शकता. त्यासाठी तुमच्या मनावर असलेली ‘गरीब मानसिकतेची’ बंधने तुम्हाला झुगारून द्यावी लागतील. पैसा म्हणजे वाईट गोष्ट आहे, जास्त पैसे हे वाईट मार्गाने कमवले जातात, पैसे हे घाम गाळून म्हणजे शारीरिक कष्टानेच कमावले पाहिजेत हे कांही लोकांनी पसरवलेले तत्वज्ञान तुम्ही झुगारून दिले पाहिजे. <br />
<br />तुम्ही विद्यार्थी असतानाही उच्च राहणीमानासाठी आवश्यक असणारे पैसे सहजपणे मिळवू शकता. चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवण्याइतकी सोपी गोष्ट कोणतीच नाही, हे माझ्या अनेक तरुण क्लाएन्त्सनी अनुभवले आहे, अनुभवत आहेत. त्यांना पैशांच्या मागे धावावे लागत नाही, तर पैसेच त्यांच्याकडे धावत येतात. मला कित्येकदा असा अनुभव येतो की मी मोटीव्हेट केलेले माझे तरुण क्लाइएन्त्स माझ्या आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा जरा जास्तच वेगात आणि अपेक्षेपेक्षा कमी वेळात स्वत:वर पैशांचा पाऊस पाडून घेत आहेत.<br /><br />तुमच्याकडे पैसे येत नसतील तुम्ही ते येऊ नयेत अशी तुमची मानसिकता करून घेतली आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडायचे कसे? हे मी तुम्हाला सांगू शकतो. ही ऑफर तरुण विद्यार्थ्यांच्या बरोबरच इतरांसाठी देखील आहे, पण केवळ त्यांच्यासाठी, जे याबाबतीत गंभीर आहेत. Time wasters not allowed. <br /><br />-महावीर सांगलीकर<br />
0 814 970 3595<br />इमेल: samdolian@gmail.com<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-62499425505667287472015-02-06T09:38:00.003-08:002015-02-06T09:38:32.557-08:00मैत्री कुणाशी करावी? संगत कुणाची धरावी? <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<br /><br />तुमचे मित्र कोण आहेत यावरून तुम्ही कोण आहात हे कळते. तुम्ही ज्यांच्या सहवासात रहाता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण आणि दुर्गुण तुमच्यात उतरत असतात.<br /><br />तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.<br /><br />1. जे लोक बुद्धीने, ज्ञानाने आणि मानाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी मैत्री करावी. त्यांच्या सहवासात राहावे.<br /><br />2. जे लोक कांहीतरी विधायक काम करत असतात त्यांच्याशीही मैत्री करावी. त्यांच्या कामात शक्य होईल तसा हातभार लावावा.<br /><br />3. गायक, संगीतकार, कलाकार, खेळाडू, वक्ते, लेखक, पत्रकार, संपादक, उद्योजक, प्रशासनातले अधिकारी, खाजगी उद्योगातील अधिकारी यांच्याशी ओळखी करून घ्याव्यात.<br /><br />4. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि मनुष्यबळ आहे त्यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवावेत. वेळप्रसंगी हे लोक तुमच्या उपयोगी पडू शकतात.<br /><br /><br />यांची संगत धरू नका<br /><br />1. जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी, प्रांतवादी आणि इतर सर्व वाद घालणा-या लोकांपासून दूर राहावे.<br /><br />2. जे लोक तुमचे मन इतर व्यक्तीविषयी अथवा समाजाविषयी कलुषित करतात, त्यांना आपल्या वा-यालाही उभे करू नये. अशा लोकांच्या संघटनांपासूनही दूर राहावे.<br /><br />3. चहाड्या करणा-या लोकांना ताकीद द्यावी, ते न सुधारल्यास त्यांना दूर करावे.<br /><br />4. रिकामटेकडे, निरर्थक गोष्टीत तुमचा वेळ वाया घालवणारे, केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी मैत्री करणारे यांची संगत धरू नये.<br /><br />5. जे स्त्रियांच्या विषयी अनुदारपणे बोलतात, स्त्रियांच्याकडे विकृत नजरेने बघतात त्यांना आपल्यापासून दूरच ठेवावे.<br /><br />6. व्यसनांच्या अतिआहारी गेलेल्या लोकांपासून दूर राहावे.<br /><br />7. सर्व प्रकारच्या विद्रोही लोकांच्यापासून दूरच राहावे, कारण हे विद्रोही लोक कोणतेही विधायक काम करत नसतात, तर कुणाच्या तरी विरोधात बोलत/लिहित रहाणे हेच त्यांचे एकमेव काम असते.<br /><br />8. जे लोक तोंडावर तुमची स्तुती करतात पण माघारी तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्याशी संबंध ठेवू नये.<br /></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-65824748374271494502015-02-06T09:35:00.000-08:002015-02-06T09:35:17.228-08:00यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 सोपे उपाय <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
-महावीर सांगलीकर</div>
<br /><br />पुढील सोपे उपाय केल्यास तुम्ही नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अनेक अडचणींवर सहज मात करता येते आणि पुढे येणा-या अडचणी टळतात. तुमच्या यशाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे.<br /><br />1. तुमचा चेहरा नेहमी हसरा ठेवा. त्याच्यावर दु:ख, वैताग, राग, उदासपणा अशा भावनांचा लवलेशही दिसू देऊ नका. चेहरा हसरा ठेवणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे. याउलट चेहरा दु:खी, उदास, रागीट, वैतागलेला ठेवण्यास तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. शिवाय असा चेहरा ठेवण्याने लोक तुमच्यापासून दूर जातात. याउलट हस-या चेह-यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. हस-या चेह-यामुळे तुम्ही प्रसन्न, आनंदी आणि पॉटझिटिव्ह रहाता, शिवाय तुमचा मित्रपरिवार वाढतो, आणि तुमचे क्लाएंट्सही वाढतात. तुमच्या यशाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे.<br /><br />2. लोकांशी आपुलकीने बोला. तुमचे हे बोलणे मनापासून पाहिजे. मनापासून आपुलकीने बोलण्यामुळे तुम्ही आनंदी रहाता आणि याच्यातून लोकांच्यामध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार होते.<br /><br />3. एखादी तोंड ओळखीची, फारसा संबंध नसलेली व्यक्ति भेटली तरी त्या व्यक्तिकडे बघून हसा. ‘हाय, हॅलो’ करा. अगदी अनोळखी व्यक्ति भेटली आणि ती तुमच्याकडे बघून हसली, तरी ती कोण आहे याचा विचार न करता तुम्हीही हसा.<br /><br />4. आनंदी, यशस्वी आणि पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत रहा. निगेटिव्ह, अपयशी, सतत दु:खी आणि व्यसनी लोकांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहा. विद्रोही. टीकाखोर लोकांपासूनही दूर रहा.<br /><br />5. एखाद्याने स्वत:च्या यशाची बातमी सांगितली, किंवा तुम्हाला दुसरीकडून ती कळली, तर त्या व्यक्तिचे मनापासून कौतुक करा. कॉन्ग्रॅट्स म्हणा. इतरांचे कौतुक करताना शब्दांची कंजूषी करू नका. भरभरून बोला. इतरांच्या वाढदिवसाला, चांगल्या प्रसंगी प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करून शुभेच्छा द्या. आपल्या जवळच्या व्यक्तिंना योग्य प्रसंगी भेटवस्तू द्या. आपला आनंद, यश शेअर करा. लोकांच्या संपर्कात रहा. प्रत्यक्षात, फोनवर त्यांची ख्याली खुशाली विचारा. लहान मुलांच्यात लहान होऊन रमा. त्यांना आनंदी बनवा. तुमच्या आनंदी आणि यशस्वी रहाण्याचे रहस्य इतरांना आनंदी करण्यात आहे.<br /><br />6. तुमच्या मनात कसलेही निगेटिव्ह विचार आणू नका. Always Be Positive.<br /><br />7. भविष्याकडे बघत वर्तमानात जगा. तुमच्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी उगाळत बसू नका. इतरांच्या भूतकाळाचा अजिबात विचार करू नका.<br /><br />8. ज्या गोष्टींशी आपला संबध नाही, अशा विषयांवर चर्चा, वादविवाद करू नका. स्वत:बद्दल बोला. ज्या व्यक्तिशी बोलताय त्या व्यक्तीविषयी बोला. बिझनेस, कामधंदा, प्लॅन्स, प्रोजेक्ट्स याबद्दल बोला. यातून तुम्हाला आनंद आणि यश मिळेल, शिवाय तुमचा प्रवास यशाच्या दिशेने होईल. तुम्ही तिस-या व्यक्तीबद्दल, संबंध नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलाल त्यावेळी तुम्हाला त्यातून कांहीच मिळणार नाही, उलट वादविवाद आणि डोकेदुखीच होण्याची शक्यता जास्त.<br /><br />9. स्वत:ला ओळखा. तुमच्या गुणांचा जास्तीत जास्त वापर करा. तुमच्या दोषांना आळा घाला. तुमच्या गुणांचा, ज्ञानाचा इतरांना फायदा होऊ द्या. (आपले अनेक गुण दोष आपल्यालाच माहीत नसतात. आपल्या जन्मतारखेवरून समजू शकतात. त्यासाठी तुम्हाला एखाद्या न्यूमरॉलॉजिस्टला भेटावे लागेल).<br /><br />10. इतरांना मोटीव्हेट करा. यातून तुम्ही स्वत: मोटीव्हेट व्हाल.<br /><br />11. योग्य वेळी आपल्या भावनांना मोकळी वाट करून द्या. व्यक्त व्हा. तुमच्याकडे एकतरी अशी व्यक्ति पाहिजे की जिच्याशी तुम्ही मोकळेपणाने, लपवाछपवी न करता बोलू शकाल, चेष्टा मस्करी करू शकाल आणि त्या व्यक्तीपुढे मनापासून हसू शकाल आणि रडूही शकाल. प्रसंगी त्या व्यक्तीसाठी भला मोठा त्यागही करू शकाल.<br /><br />12. पेपरमधील फक्त उपयुक्त बातम्या आणि लेख वाचा. राजकीय बातम्या, निगेटिव्ह बातम्या, गुन्हेगारी वगैरे विषयांच्या बातम्या वाचायचे टाळा. टी. व्ही. वर राजकीय चर्चा, बातम्या बघण्यात आपला वेळ वाया घालवू नका. <br /><span style="font-family: Verdana,sans-serif;"><br />Mahaveer Sanglikar<br />Numerologist & Motivator<br />8149703595 , 9623725249 </span></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1928289240089263503.post-83592090111106429012015-02-06T09:26:00.000-08:002015-02-06T09:26:01.446-08:00माझ्या आयुष्यातील सोनेरी काळ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: right;">
<span style="font-family: Verdana,sans-serif;"> This Luck is not by Chance but Preplanned -महावीर सांगलीकर</span></div>
<br /><br />मी माझ्या आयुष्यातील सोनेरी काळात प्रवेश केला आहे. हात घालीन तिथं अविश्वसनीय यश, प्रचंड प्रसिद्धी, मिळणारा मान-सन्मान, खचलेल्या लोकांना उभारी देण्याची माझ्याकडे आलेली अनोखी ताकत, माझ्या प्रतिभेला आलेली आगळी बहर, प्रचंड मानसिक समाधान, पैसाच पैसा..... आणखी काय पाहिजे?<br /><br />हे सगळं शक्य झाले, ते न्यूमरॉलॉजीमध्ये मी केलेल्या कांही प्रयोगांमुळे.<br /><br />कोणतेही प्रयोग हे आधी प्राण्यांवर केले जातात, पण हे प्रयोग मी डायरेक्ट स्वत:वरच केले. त्यात कसलाही धोका नाही, उलट फायदाच फायदा आहे याची खात्री झाल्यावरच मी ते आणखी एका विश्वासू व्यक्तीवर केले. त्याचा त्या व्यक्तीला माझ्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. माझे यश याच्यात आहे की माझ्यापेक्षा दुस-याला जास्त फायदा झाला म्हणून माझ्या मनात जेलसी हा भाव अजिबात तयार झाला नाही, उलट कधी न झाला असेल इतका आनंद झाला.<br /><br />दुस-याच्या यशासाठी झटणे यातच माझे यश आहे हे मला केवळ न्यूमरॉलॉजीच्या डीप स्टडीमुळेच कळले.<br /><br />पण याच्यामागे फार मोठी तपस्या आणि त्याग आहे. मला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. अनेक निगेटिव्ह लोकांना माझ्या आयुष्यातून दूर करावे लागले. टी.व्ही., सिनेमा, बातम्या बघणे सोडून द्यावे लागले. पेपर वाचणे देखील सोडून द्यावे लागले. निरर्थक गप्पा, टाईम पास यांना पूर्ण फाटा द्यावा लागला. एकांतामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा लागला. आपल्या हातून कांही चूक झाल्यास ‘सेल्फ पनिशमेंट’ करावी लागली.<br /><br />मी माझ्या मिशनवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यानेच मी हे यश मिळवू शकलो.<br /><br />पुढे काय? मी स्पष्ट बघतोय.... यापेक्षाही भव्य दिव्य माझ्याकडून होणार आहे....<br /><br />मी आभारी आहे सर्वांचा... मित्रांचा, कारण त्यांनी मला संकट काळात मदत केली. .. शत्रूंचा, कारण त्यांच्यामुळे मला बरेच कांही शिकायला मिळाले.... विद्रोही मानसिकतेच्या चळवळ्यांचा, धर्मवादी आणि जातीय वाद्यांचा, कारण भरकटलेले जीवन आणि स्टुपिडिटी कशाला म्हणतात ते मला त्यांच्या वागण्यामुळे आणि ते ज्या विचार सरण्यांना बळी पडले आहेत, त्यामुळे कळून चुकले.<br /><br />पण या सर्वांपेक्षा मी आभारी आहे माझ्या कांही क्लाएंट्सचा, ज्यांना मोटीव्हेट करायला जाऊन मीच मोटीव्हेट झालो.<br /><br />महावीर सांगलीकर<br /><span style="font-family: Verdana,sans-serif;">Numerologist & Motivator<br />Cell No. 814 970 3595, 962 372 5249</span></div>
Mahaveerhttp://www.blogger.com/profile/05978485097517016289noreply@blogger.com0