Advt.

Advt.

Monday 13 July 2015

तुमचे प्रॉब्लेम्स सुटण्यासाठी……

-महावीर सांगलीकर
मोबाईल फोन: 8149703595


मला अनेकदा अनुभव येतो की बहुतेक लोकांना त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यात, दिलेले सल्ले पाळण्यात रस नसतो. एखाद्या विश्वासू व्यक्तिने आपल्या व्यथा ऐकून घ्याव्यात एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. आपले मन कुणापुढे तरी मोकळे केले की त्यांना बरे वाटते.

पण नुसते मन मोकळे झाले म्हणून मूळ प्रश्न कसा काय सुटेल? ज्या व्यक्तिपुढे तुम्ही मन मोकळे करता, ती व्यक्ति जर समुपदेशक असेल, अनुभवी असेल तर तिने दिलेले सल्ले तुम्ही अमलात आणले तरच तुमचे प्रश्न सुटू शकतात. पण वर लिहिल्या प्रमाणे जर अनेक लोकांना आपले प्रश्न सुटावेत असे वाटतच नाही, निदान त्यांच्या सुप्त मनात तरी, तर ते लोक सल्ले कशाला पाळतील? अनेकांच्या  बाबतीत तर असे वाटते की ते आपले प्रॉब्लेम्स एन्जॉय करत असावेत. दु:ख, व्यथा, चिंता यातच आनंद मिळत असेल तर प्रश्न सोडवून घेण्याची गरजच काय?

पण ज्यांना खरोखरच आपले प्रॉब्लेम्स सुटावेत असे वाटते, त्यांनी पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
तुम्हाला जे कांही प्रॉब्लेम्स असतील, ते लवकरात लवकर सुटावेत यासाठी तुम्ही लगेच प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही स्वत: चिंतन, विचार करून पुढे काय करायचे ते ठरवू शकता. तसेच गरज असेल तर तुम्ही अनुभवी व्यक्ति, समुपदेशक यांचा सल्ला घेऊ शकता. त्यांनी दिलेले सल्ले शास्त्रीय, मनोवैज्ञानिक असतील तर ते तुम्ही लगेच अमलात आणले पाहिजेत. सल्ला देणारी व्यक्ति तुम्हाला अंधश्रद्धा वाढवणारे सल्ले देत असेल (खडे, अंगठ्या, ताईत, गंडे दोरे, पूजा अर्चा, कर्मकांड वगैरे) तर अशा सल्ल्यांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.  अशा सल्ल्यांमुळे तुम्हाला तात्पुरते समाधान मिळते. त्याचा कायम स्वरूपी उपयोग होत नाही. तुमच्या प्रॉब्लेम्सचे मूळ आणि मुख्य कारण तुमचा उपजत स्वभावदोष आणि त्यामुळे तुमच्या हातून होत असणाऱ्या चुका हेच असते, ही गोष्ट तुम्ही नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. 

प्रॉब्लेम सोडवण्यात चालढकल केल्याने तुमचे प्रॉब्लेम्स आणखीनच वाढत जातात ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

हेही वाचा:
सोडा हा फुकटेपणा
यशाचे रहस्य: यशस्वी, आनंदी, प्रसन्न रहाण्याचे 12 स...
उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी

No comments:

Post a Comment